Crop Insurance Ativrushti Yadi 2022 | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जुलै ते ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी (Agriculture) मदतीचा जीआर काढण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली आहे.
मात्र, या पीक विम्याच्या लाभासाठी कोणते शेतकरी पात्र असतील हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या पीक विम्याच्या आर्थिक (Financial) मदतीसाठी कोणते शेतकरी पात्र असतील.
या २ जिल्ह्यांचा अतिवृष्टी पीकविमा मंजूर
किती मिळणार मदत?
या शासन निर्णयाअंतर्गत 3 हजार 456 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर यामध्ये जिरायत शेतीतील पिकाच्या (Agriculture in Maharashtra) नुकसानीसाठी 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत.
बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. तर बहुवार्षिक पिकाच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरीत केले जाणार आहे.