Ration Card New Update 2022: मोठी बातमी! फक्त “या तारखेपर्यंत” मिळणार मोफत रेशन, या नागरिकांचे रेशन होणार बंद

लोकसुत्र अधिकृत
छायाचित्र क्रेडिट - मराठी कॉर्नर

Ration Card New Update

शासनाकडून कमी उत्पन्न असलेल्या लोकांना रेशनकार्डवर सवलतीच्या दरात व कोरोनाच्या वाईट काळामध्ये मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया करण्यात आली. परंतु ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे उत्पन्न वाढले आहे, असे भरपूर लोक आणखी सुद्धा शासनाच्या या योजनेचा लाभ घेत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे सवलतीवर मिळणारे मोफत रेशन धान्य अनेक लोक खाण्यासाठी न वापरता त्याची विक्री करतात; तर काही लोक जनावरांसाठी त्याचा वापर करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला गोरगरीब कुटुंबातील लोकांना रेशन मिळत असल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत.

Ration Card Cancel List: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांसाठी आजची ही मोठी बातमी आहे. वास्तविक आता ही योजना बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी विभागाकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोरोनाच्या काळात लोकांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती, त्यामुळे लोकांना स्वतःसाठी अन्न गोळा करणे आणि उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते.

यानंतर सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) सुरू केली आणि लोकांना मोफत अन्नधान्य दिले. आता ही योजना सप्टेंबरनंतर बंद होऊ शकते. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खर्च विभागाने ही योजना सप्टेंबरच्या पुढे वाढवू नये, अशी सूचना सरकारला केली आहे.

या लोकांच रेशन कार्ड रद्द होणार ! तुम्ही यात आहेत का ?

Emoji

इथे क्लिक करून पहा

या योजनेमुळे देशावरील आर्थिक बोजा खूप वाढत असल्याचे व्यय विभागाने म्हटले आहे. म्हणजेच देशाच्या आर्थिक रचनेवर यामुळे परिणाम होईल. गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्क कमी करण्यात आले होते, त्यामुळे महसुलावर सुमारे एक लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला आहे. आता आणखी दिलासा मिळाल्यास आर्थिक बोजा आणखी वाढणार आहे.

विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारी आल्यापासून सरकारचा सर्वाधिक पैसा अन्न अनुदानावर खर्च करण्यात आला आहे. देशातील सुमारे 80 कोटी लोकांना रेशन मोफत दिले जात आहे.

यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला असला तरी सरकारवरील आर्थिक बोजा खूप वाढला आहे. त्याचवेळी, खर्च विभागाचे म्हणणे आहे की जर ही योजना आणखी 6 महिने वाढवली तर अन्न अनुदानाचे बिल 80,000 कोटी रुपयांवरून सुमारे 3.7 लाख कोटी रुपये होईल.

या लोकांच रेशन कार्ड रद्द होणार ! तुम्ही यात आहेत का ?

Emoji

इथे क्लिक करून पहा

तहसीलदार यांच्यामार्फत आवाहन

तालुक्यातील तहसीलदार यांच्यामार्फत सर्व रेशन दुकानदारांनासुद्धा याबाबत बैठक घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment
Close Visit Havaman Andaj